सुगंधी वृक्षांना घोटाळ्याचा दर्प
एक लाख वृक्ष आणि एक लाख सुगंधी वनस्पतींच्या लागवडीवरून ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर निर्माण झालेल्या संशयाला शुक्रवारी खतपाणी मिळाले. प्रस्तावानुसार बोरीवडे गावात अपेक्षित असलेली वृक्षलागवड झालीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.